डॉल्बी बंदीचा ‘चिंचणी पॅटर्न’: महाराष्ट्राने दखल घ्यायलाच हवी!
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डॉल्बीचा मुद्दा पुन्हा तापला असला तरी, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी गावाने तर दोन वर्षांपूर्वीच यावर कायमचा तोडगा काढला आहे. चिंचणीचा हा ‘डॉल्बी बंदी पॅटर्न’ आता राज्याने आदर्श म्हणून घेणे गरजेचे आहे.
