Konkan Hapus News | खराब हवामानामुळे आंबा उत्पादनात मोठी घट । वाचा आंबा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा ।
कोकणातील Hapus Mango आंबा यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. प्रतिकूल हवामान, धुक्याचे वाढते प्रमाण आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून अपेक्षित उत्पन्नाऐवजी केवळ १५ ते २० टक्केच आंबा तयार झाला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि घटलेली गुणवत्ता यामुळे आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ग्राहकांना अधिकाधिक आंबे खरेदी करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. (Konkan Mango Crisis, Mango Production Decline, Maharashtra Mango News) आंबा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समोर आणणारा राईट अँगलचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा रिपोर्ट नक्की वाचा…
