शेतकऱ्यांना पाण्याचा थेंब मिळेना नेत्यांची मात्र सोशल मीडियावर फोटोबाजी । संजय पाटील आक्रमक ।

तासगाव तालुक्याच्या सिंचन प्रश्नावरून माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil ) यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाणी येत असल्याचे पोकळ दावे करत आहेत,असा थेट आरोप संजयकाका पाटील यांनी आज सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनादरम्यान केला. तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यात विद्यमान यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र सध्या दिसत असल्याचे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.

Continue reading