” महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त दि.१९ मार्चला महाड क्रांतिभूमीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे,” मानवी हक्क परिषद “

जगाच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड क्रांतिभूमीतील सामाजिक समतेच्या चवदार तळे पाणी सत्याग्रह लढ्याला ऐतिहासिक महत्व आहे. याच धर्तीवर दि.१९/२० मार्च २०२६ रो कोकणातील महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे.याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला.

Continue reading

कोट्यवधींचा खर्च ; छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्प अपूर्ण

पिंपरी-चिंचवड शहरात मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या १०० फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा प्रकल्पावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. दरम्यान, उर्वरित कामांसाठी सुमारे ५० कोटी रुपयांच्या दोन नव्या निविदा काढण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडून पुढे आल्याची चर्चा आहे. या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर निविदांचा प्रस्ताव तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे पुतळा प्रकल्पातील खर्च आणि कामाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Continue reading