” महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त दि.१९ मार्चला महाड क्रांतिभूमीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे,” मानवी हक्क परिषद “
जगाच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड क्रांतिभूमीतील सामाजिक समतेच्या चवदार तळे पाणी सत्याग्रह लढ्याला ऐतिहासिक महत्व आहे. याच धर्तीवर दि.१९/२० मार्च २०२६ रो कोकणातील महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे.याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला.
