शहरातील सर्व रिक्षा स्टँड ‘आदर्श समाजसेवा केंद्र’ बनावेत : डॉ. बाबा कांबळे

भोसरी येथील यशवंतनगर चौकात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी शहरातील सर्व रिक्षा स्टँड हे ‘आदर्श समाजसेवा केंद्र’ बनावेत, असे आवाहन केले.

Continue reading

” महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त दि.१९ मार्चला महाड क्रांतिभूमीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे,” मानवी हक्क परिषद “

जगाच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड क्रांतिभूमीतील सामाजिक समतेच्या चवदार तळे पाणी सत्याग्रह लढ्याला ऐतिहासिक महत्व आहे. याच धर्तीवर दि.१९/२० मार्च २०२६ रो कोकणातील महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे.याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला.

Continue reading