निष्ठावंतांना डावलत राष्ट्रवादीची आयात उमेदवारी; विक्रम काकडे यांच्या निवडीवर पक्षात नाराजी
विलास लांडे, सुनील टिंगरे, योगेश बहल यांच्यासह अनेक इच्छुकांना डावलल्याची चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण
विलास लांडे, सुनील टिंगरे, योगेश बहल यांच्यासह अनेक इच्छुकांना डावलल्याची चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण
तासगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, प्रलंबित प्रस्तावांच्या निवारणाला अखेर गती मिळाली आहे. आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तब्बल 70 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
कोकणातील Hapus Mango आंबा यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. प्रतिकूल हवामान, धुक्याचे वाढते प्रमाण आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून अपेक्षित उत्पन्नाऐवजी केवळ १५ ते २० टक्केच आंबा तयार झाला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि घटलेली गुणवत्ता यामुळे आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ग्राहकांना अधिकाधिक आंबे खरेदी करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. (Konkan Mango Crisis, Mango Production Decline, Maharashtra Mango News) आंबा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समोर आणणारा राईट अँगलचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा रिपोर्ट नक्की वाचा…
खानापूर–आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी गलाई बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांना विधानसभेत आवाज दिल्यानंतर त्यांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर All Kerala Gold and Silver Maratha Associationच्या पदाधिकाऱ्यांनी विटा येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. बैठकीत कारागीरांवरील चौकशी, कायदेशीर संरक्षण आणि मदत यंत्रणा उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
रत्नागिरी येथील पत्रकार दीपक भागवत यांच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करून घेतला खरा पण सीसीटीव्हीमध्ये आरोपींचा चेहरा स्पष्ट दिसत असतानाही हल्लेखोर मात्र अद्यापही मोकाट आहेत. पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.