संजयकाकांच्या प्रयत्नातूनच बायपाससाठी ८५ कोटींचा निधी; आमदार रोहित पाटलांची केवळ ‘स्टंटबाजी’!
तासगाव शहराच्या वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि गेली अनेक दशके रखडलेल्या बायपास रस्त्याचा प्रश्न माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच सुटला आहे. काकांनी विशेष बाब म्हणून अर्थसंकल्पात ८५ कोटी रुपयांची तरतूद केल्यानेच आज शेतकऱ्यांच्या हातात मोबदल्याचे धनादेश पडत आहेत, असे प्रतिपादन तासगावच्या नगराध्यक्षा विजया पाटील यांनी केले. तासगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
