उमटे धरणाच्या गाळासाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद करण्याचे जि.प.अध्यक्षांना निवेदन,,,

पाली/बेणसे दि: (धम्मशील सावंत)उमटे धरणाच्या गाळाचा व शुद्ध पाण्याच्या प्रश्नांवर योग्य व जलद उपाययोजनेसाठी उमटे धरण संघर्ष ग्रुपने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री मंगेश वाकडीकर यांची उमटे धरण संघर्ष ग्रुपचे अँड राकेश पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ सचिन राऊळ यांच्या समवेत भेट घेतली, उमटे धरण संघर्ष ग्रुपने निवेदनही दिले आहे, सदरच्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या रायगड जिल्हा परिषदेकडे सध्या १५ व्या वित्त आयोगाचा ५० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. सदरच्या निधी पैकी आपण उमटे धरणाचा गाळ व शुध्द पाण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, उमटे धरण हे आपल्याच जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे.

Continue reading

Konkan Hapus News | खराब हवामानामुळे आंबा उत्पादनात मोठी घट । वाचा आंबा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा ।

कोकणातील Hapus Mango आंबा यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. प्रतिकूल हवामान, धुक्याचे वाढते प्रमाण आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून अपेक्षित उत्पन्नाऐवजी केवळ १५ ते २० टक्केच आंबा तयार झाला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि घटलेली गुणवत्ता यामुळे आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ग्राहकांना अधिकाधिक आंबे खरेदी करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. (Konkan Mango Crisis, Mango Production Decline, Maharashtra Mango News) आंबा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समोर आणणारा राईट अँगलचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा रिपोर्ट नक्की वाचा…

Continue reading