उमटे धरणाच्या गाळासाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद करण्याचे जि.प.अध्यक्षांना निवेदन,,,

पाली/बेणसे दि: (धम्मशील सावंत)उमटे धरणाच्या गाळाचा व शुद्ध पाण्याच्या प्रश्नांवर योग्य व जलद उपाययोजनेसाठी उमटे धरण संघर्ष ग्रुपने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री मंगेश वाकडीकर यांची उमटे धरण संघर्ष ग्रुपचे अँड राकेश पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ सचिन राऊळ यांच्या समवेत भेट घेतली, उमटे धरण संघर्ष ग्रुपने निवेदनही दिले आहे, सदरच्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या रायगड जिल्हा परिषदेकडे सध्या १५ व्या वित्त आयोगाचा ५० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. सदरच्या निधी पैकी आपण उमटे धरणाचा गाळ व शुध्द पाण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, उमटे धरण हे आपल्याच जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे.

Continue reading

शेतकऱ्यांना पाण्याचा थेंब मिळेना नेत्यांची मात्र सोशल मीडियावर फोटोबाजी । संजय पाटील आक्रमक ।

तासगाव तालुक्याच्या सिंचन प्रश्नावरून माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil ) यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाणी येत असल्याचे पोकळ दावे करत आहेत,असा थेट आरोप संजयकाका पाटील यांनी आज सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनादरम्यान केला. तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यात विद्यमान यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र सध्या दिसत असल्याचे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.

Continue reading