बेदाणा उधळणारा व्यापारी विनीत बाफनाचा परवाना रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करा

तासगाव : आमदार रोहित पाटील यांच्या पुढाकारानंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने बेदाणा सौद्यावेळी बेदाणा उधळू नये, सौद्यात घेतलेला बेदाणा पुन्हा बॉक्समध्ये ठेवावा, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्याला सौद्यातून बाहेर काढण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या बेदाणा सौद्यात व्यापारी विनीत बाफना यांनी बेदाणा उधळल्याचा आरोप करत मनसे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी बाजार समिती प्रशासनाकडे धडक देत परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.

Continue reading

आ. रोहित पाटलांना जि. प. सदस्याच्या कामाचेही श्रेय पुरेना -संजयकाकांचा हल्लाबोल

तासगाव तालुक्यातील खुजगाव येथे शाळेच्या नवीन खोल्यांच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला चक्क राजकीय रंग चढला. माजी खासदार संजय काका पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. जिल्हा परिषद सदस्याने आणलेल्या शाळेच्या खोल्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत ‘हापापलेली भिकारी प्रवृत्ती’ असा उल्लेख करत अशी कृती पुन्हा केल्यास ‘जशास तसे उत्तर देऊ,’ असा थेट इशाराही दिला.

Continue reading

तासगावात FDA च्या नाकाखाली गुटख्याची उघड विक्री, ‘होम डिलिव्हरी’ आणि ‘इन्फॉर्मर’मुळे धाडी फसतात का?

राज्यभरात अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA ने गुटखा बंदीसाठी कडक कारवाई सुरू असताना, सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात मात्र बंदी असलेला गुटखा अगदी ‘होम डिलिव्हरी’ सह राजरोसपणे विकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या महिन्यात काही काळ गायब झालेला गुटखा आता पुन्हा उघडपणे विक्रीला आल्याने सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Continue reading

स्वातंत्र्यदिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांची ऑस्ट्रेलियाच्या माऊंट कोसिअस्कोवर तिसऱ्यांदा यशस्वी चढाई

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माऊंट कोसिअस्कोवर 360 एक्स्पलोररचे संस्थापक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याच्यासोबत इतर 3 गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई करत भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

Continue reading

ॲट्रॉसिटी ॲक्टच्या खटल्यांसाठी राज्यात ५ अनन्य विशेष न्यायालये

मुंबई : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत दाखल प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्रात पाच अनन्य विशेष न्यायालये (Exclusive Special Courts) स्थापन करण्याचा शासन निर्णय राज्याच्या विधी व न्याय विभागाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केला आहे. अहमदनगर (अहिल्यानगर), परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे.

Continue reading

आदिवासी दिनाच्या दुसऱ्याच दिवशी गडचिरोली हादरले; जपतलाई आश्रमशाळेत ३ विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू

आदिवासी दिनाच्या दुसऱ्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश झाल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Continue reading

बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनचा वनसंवर्धनासाठी पुढाकार; आसानेवाडीत ४०० स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड

दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी मौजे. आसानेवाडी च्या सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त वनक्षेत्र कंपा. नं. ६३३/६३४ मध्ये वनमोहात्सव २०२६-२०२७ कालावधीत वनीकरणाचे ध्येय गाठणे, वनच्छादित क्षेत्र वाढवणे, वनसंपत्तीचे शाश्वत व समसमान व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन, सामूहिक वनव्यवस्थापन समिती, आसानेवाडी व वातावरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. २०२३ ते २०२५ या कालावधीत सामूहिक वनव्यस्थापन समिती, आसनेवाडी च्या वतीने स्थानिक प्रजातींच्या ३२२० इतक्या रोपांची जवळपास ८ हेक्टर इतक्या वनक्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात आली होती.

Continue reading

रायगडच्या पत्रकारांसाठी ऐतिहासिक पाऊल; भव्य पत्रकार भवनाच्या मागणीला महसूलमंत्री बावनकुळे यांची तात्काळ मंजुरीची ग्वाही

रायगड जिल्ह्यात पत्रकार भवन उभारण्याच्या मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सकारात्मक प्रतिसाद. राईट अँगल मराठीचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना. रायगडच्या पत्रकारांसाठी ऐतिहासिक पाऊल.

Continue reading

“‘मी स्वतः सिकलसेलचा वाहक आहे’ | वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची जाहीर कबुली, लग्नापूर्वी रक्ततपासणीचे आवाहन”

नागपुरातील शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात नागालँडचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप तामगाडगे यांनी आपण सिकलसेलचे वाहक असल्याचे जाहीरपणे सांगितले.
सिकलसेलवरील मौन तोडण्याचे आवाहन करत त्यांनी लग्नापूर्वी रक्ततपासणी आणि योग्य वैद्यकीय समुपदेशनाची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना ‘अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती’ देण्यात आली.
तुकाराम मुंढे यांनीही विद्यार्थ्यांना मोबाईलचा सुज्ञ वापर आणि माहितीची पडताळणी करण्याचा सल्ला दिला.

Continue reading

जाती मोडू नये म्हणून धर्मांतर बंदी कायदा ?

बौद्ध प्रभावाच्या काळात ब्राह्मणी धर्माने आपली जातीव्यवस्था आणि धर्म टिकवून ठेवण्यासाठी ‘परधर्म भयावह’ अशी भीती भगवद्गीतेच्या माध्यमातून लोकांच्या मनात ठोकून दिली. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, मध्ययुगात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम धर्मांतरे होण्यापूर्वीच देशातील सर्वसामान्य जनता जैन, लिंगायत, महानुभाव आणि शीख अशा वेगवेगळ्या समतावादी धर्मांकडे आकर्षित होऊन धर्मांतरित झाली होती. पुढे आधुनिक काळात ख्रिश्चन धर्माचे आगमन झाले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन झाले. या सर्व घडामोडींत हिंदू धर्मात बाहेरून धर्मांतर होऊन येणे कधीच शक्य नव्हते; कारण नव्या व्यक्तीला नेमक्या कोणत्या जातीत सामावून घ्यायचे, हा एक न सुटणारा प्रश्न आहे. म्हणूनच, सद्यस्थितीतील ‘धर्मांतर बंदी कायदा’ हा प्रत्यक्षात धर्म वाचवण्यासाठी नसून, जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठीच आणला गेला आहे.

Continue reading